Thursday, May 30, 2013

होऊ घातलेला घट्ट मित्र




म्हणजे तो मित्र होता, पण अगदी जवळचा म्हणावा इतका नाही.

काही माणसांना फार न भेटताही ती जवळची वाटतात.  
आत कुठेतरी खात्री वाटते आपल्या तारा नक्की जुळणार म्हणून. 
तिथे कधी गैरसमज वगैरे होत नाहीत. 
सवड मिळेल तशी, हळुहळू ही मैत्री मस्त फुलत जाणार आहे याची खात्री असते अपल्याला. 
पण हे सगळं घडून यायला आपल्याला वेगळं काही तातडीने करायची गरज आहे, हे सगळं जगाच्या अंतापर्यंत असंच राहणार नाही हे समजून न घेण्याचा करंटेपणा करतो आपण. 
कशाची वाट बघत असतो आपण नेमकी? 

ही आपोआप फुलण्याची अपेक्षा असणारी मैत्री तशीच अर्धवट टाकून जाणारा निघून जातो. 
हे काही जाण्याचं वय नव्हतं वगैरे सगळ्या बोलण्याच्या गोष्टी. 
तसं म्हटलं, तर कुठलंही वय जाण्याचं असतंही आणि नसतंही.
आपण मात्र अमरपट्टा घेऊन आल्यासारखे वागत असतो. 

एक गुणी माणूस अकाली गेला याचं वाईट वाटणं हा एक भाग झाला. 
त्याने करण्यासारख्या, हाती घेतलेल्या किती गोष्टी होत्या, त्याच्या जाण्यानं किती नुकसान झालं हे सगळं आहेच. 

तुझी मला किती किंमत वाटते हे त्याच्याजवळ व्यक्त न करण्याची बेपर्वाई आपण केलीय याची बोच आता आयुष्यभराची.


6 comments:

Anagha said...

पुढल्या आयुष्यात भेट होणार हे नक्की…

Gouri said...

हो ग अनघा, तीच आशा आहे.

Meghana Bhuskute said...

अगदी अगदी. काही बोलण्यासारखं नाहीच.

Gouri said...

मेघना, :)

aativas said...

मित्रांजवळ सगळ्या गोष्टी बोलाव्या लागत नाहीत - त्या तू न बोलताही त्याला माहिती असणार ... अशी माझी खात्री आहे...

Gouri said...

सविता, याचा मी विचारच केला नव्हता! मी शब्दात मांडलं नाही तरी त्याला समजलं असेलच की! किती दिलासा वाटला या विचाराने!